Bhaubij mahiti marathi , भाऊबीज शुभ मुहूर्त कधी आहे

  Bhaubij,भाऊबीज माहिती मराठी,भाऊबीज निबंध मराठी,भाऊबीज कशी साजरी करावी?बहीण भावाचा सण भाऊबीज,भाऊबीज साजरी करण्यामागचे महत्व,भाऊबीज मुहूर्त 2021,भाऊबीज मुहूर्त 2022.



आपण दरवर्षी खूप मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करतो.भारतात सर्वात जास्त दिवस साजरा केला जाणारा सण म्हणून ओळखला जातो.दिवाळी या पाच दिवस चालणाऱ्या सणात विविध सण येतात.धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन,दिवाळी पाडवा,भाऊबीज अशी सणांची रेलचेल दिवाळी या एकाच सणामध्ये असते.या सर्व सणांपैकी आज आपण भाऊबीज या सणाची माहिती बघणार आहोत.


बहीण भावाचा सण भाऊबीज


भाऊबीज हा सण खऱ्या अर्थाने बहीण आणि भावाच्या प्रेमाचा सण म्हणून ओळखला जातो.या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे जाऊन तिच्या हातचे गोडधोड पदार्थ चाखत असतो.बहीण पण आपल्या भावाला विविध प्रकारचे पदार्थ भरवत असते.खऱ्या अर्थाने बहीण भावाचा उत्सव या सणाच्या निमित्ताने पाहायला मिळत असतो.

या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते.भाऊ पण आपल्या लाडक्या बहिणीला तिच्या आवडतीची भेटवस्तू देऊन तिला खुश ठेवत असतो.बहीण भाऊ एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र येऊन त्याविरुद्ध लढण्याचे बळ मिळवण्यासाठी हा सण खूप महत्वाचा आहे.


भाऊबीज का साजरी करण्यात येते?


दरवर्षी कार्तिक शुध्द द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो.पौराणिक कथेनुसार थोडक्यात सांगायचे झाले तर याच दिवशी यम हा त्याची बहीण यामिकडे जेवायला गेला होता म्हणून या दिवसाला यमद्वितिया म्हणूनही ओळखले जाते.या दिवशी द्वितीयेचा आकर्षक चंद्र दिसत असतो.चंद्राच्या साक्षीने भाऊ बहिणीच्या प्रेमाची जपणूक करणारा हा दिवस मानला जातो.

या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो.बहीण भावास न्हाऊ माखु घालते.संध्याकाळी चंद्राचे दर्शन घेऊन बहीण आपल्या भावाला ओवाळते.भाऊ पण आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी देत असतो.


आधुनिक काळात बहीण भावाचे नाते जपणारा सण भाऊबीज


आजच्या आधुनिक काळात स्वतंत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहेत.जो तो आपल्या नात्याच्या व्यक्तींना ओळखेणा झाला आहे.ज्याला त्याला आपले काम प्रिय आहे.अशा प्रकारे भरकटत चाललेल्या समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न करणारा सण म्हणून भाऊबीज ओळखला जातो.

आजच्या युगात भाऊ लोक काय म्हणतील म्हणून तरी बहिणीकडे जात असतो.आजच्या आधुनिक काळात स्वतंत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आल्यामुळे सर्व नातेसंबंध संपुष्टात आले आहेत.पण भाऊबीज हा सण या सर्व गोष्टींना छेद देणारा सण आहे.आजच्या काळात देखील किंचित अपवाद वगळता सर्व भाऊ बहीण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात भाऊबीज हा सण साजरा करतात.


भाऊबीज मुहूर्त 2022


तिथीनुसार 27 ऑक्टोबरला भाऊबीज साजरी होणार आहे. या दिवशी भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 12 वाजून 14 मिनिटांपासून ते 12 वाजून 47 मिनिटांपर्यंत असणार आहे.


भाऊबीज मुहूर्त 2021


या वर्षी भाऊबीज हा पवित्र सण दिनांक 6 नोव्हेंबर 2021 शनिवार या दिवशी येत आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार भाऊबीज मुहूर्त


भावाला तिलक करणे व औक्षण करणे दुपारी 01 वाजून 10 मिनिटे ते दुपारी 03 वाजून 21 मिनिटे हा शुभ मुहूर्त आहे जो एकंदरीत 02 तास 11 मिनिटांचा अवधी आहे.


कोणताही सण किंवा कार्य असूद्या ते मुहूर्त पाहून केले जाते.हिंदू धर्मात मुहूर्त हा खूप महत्वाचा असतो.भाऊबीजेला देखील मुहूर्त पाळुन भाऊबीज हा सण साजरा करण्यात येतो.


भाऊबीज सण कसा साजरा करावा?

How to celebrate bhaubij


बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला सर्वात मोठा सण म्हणून भाऊबीज हा सण साजरा करण्यात येतो.भारतात तसेच विदेशातही भाऊबीज हा सण साजरा करण्यात येतो.भाऊबीज हा सण कसा साजरा करावा हे आपण पाहणार आहोत.

कार्तिक शुध्द द्वितीयेला भावाने बहिणीच्या घरी जावे.

बहिणीने भावाला अभ्यंग स्नान घालावे.

पूजेचे ताट तयार करावे.

ताटात अक्षदा,कुंकू,हळद,सोने,गोड बर्फी, करदोटा असावा.

शुभ मुहूर्त पाहून बहिणीने भावाला औक्षण करून ओवाळावे.

यमाच्या नावाने दिवा लावून बाहेर ठेवावा.

बहिणीने भावाला आवडीचे पदार्थ खाऊ घालावे.

भावाने बहिणीला ओवाळणी द्यावी.


या प्रकारे भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.बहीण भावाचा सण म्हणतात तो याच कारणामुळे.भाऊबीज हा दिवाळीतील सर्वात महत्वाचा समाजातील प्रेम , आपुलकी निर्माण करणारा सण आहे.Bhaubij,भाऊबीज माहिती मराठी,भाऊबीज निबंध मराठी,भाऊबीज कशी साजरी करावी?बहीण भावाचा सण भाऊबीज,भाऊबीज साजरी करण्यामागचे महत्व,भाऊबीज मुहूर्त 2021,भाऊबीज मुहूर्त 2022.

 हा Information G वरील लेख आवडला तर नक्की शेअर करा.



लक्ष्मी पूजन 2022 मुहूर्त,lakshmipujan muhurt 2021

  Lakshmi Pujan, Lakshmi Puja diwali, लक्ष्मी पूजन,लक्ष्मी पूजन मुहूर्त 2021,दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे? लक्ष्मीपूजन विषयी माहिती,कुबेर पूजन,कुबेर पूजन कसे करावे.


Lakshmi Pujan, Lakshmi Puja diwali, लक्ष्मी पूजन,लक्ष्मी पूजन मुहूर्त 2021,दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे? लक्ष्मीपूजन विषयी माहिती.

हिंदू धर्मात सर्वात मोठा उत्सव,सण म्हणजे दिवाळी होय.दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.हा सण जवळ जवळ चार ते पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यामध्येवसुबारस,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन,बलिप्रतिपदा,भाऊबीज हे सण येतात.खऱ्या अर्थाने हिंदू धर्मियांच्या जीवनात आनंद,तेज आणण्याचे काम दिवाळी हा सण करत असतो.दिव्यांचा,फटाक्यांचा,आनंदाचा,दिवाळी फराळाचा आणि नवनवीन खरेदी करण्याचा असा हा आनंदाचा सण आहे.

आज आपण Information G वरील या लेखात Lakshmi Pujan, Lakshmi Puja diwali, लक्ष्मी पूजन,लक्ष्मी पूजन मुहूर्त 2021,दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे? लक्ष्मीपूजन विषयी माहिती,कुबेर पूजन,कुबेर पूजन कसे करावे.याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.


काय आहे नरकचतुर्दशी चा ईतिहास ?


पूर्वीच्या काळी भूतलावर नरकासुर नावाचा बलाढ्य असुर राज्य करत होता.सर्व पृथ्वी तलवार त्याचा नंगानाच चालू होता.सर्व जनतेला,देवांना तो त्रास देऊ लागला.सर्वांचे हाल हाल करू लागला.त्याने स्रियांचा पण छळ चालवला होता.त्याने बंदिवान केलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्या होत्या आणि त्यांच्याशी विवाह करण्याची तयारी त्याने तयारी चालवली होती. श्रीकृष्णास जेव्हा ही माहिती समजली तेंव्हा त्यांनी सत्यभामेस बरोबर घेऊन नारकासुरावर चाल करून त्याचा वध केला.पण नरकासुराणी मरता मरता श्री कृष्णाकडे एक वर मागितला त्यानुसार आजच्या म्हणजेच आश्विन वैद्य चतुर्दशी या दिवशी जे लोक पहाटे पहाटे स्नान करतील त्यांना नरकपासून सुटका मिळेल.म्हणून या दिवसाला सर्व लोक पहाटे पहाटे अभ्यंग स्नान करतात.नरकचतुर्दशी हा सण खऱ्या अर्थाने वाईटाचा नाश करणारा सण आहे.या दिवशी सर्व लोकांनी अभ्यंगस्नान करणे फायदेशीर असते.


लक्ष्मी पूजन


दिवाळी हा सण लक्ष्मीपूजन शिवाय कसा पूर्ण होईल? लक्ष्मीपूजन हा एक अत्यंत महत्वाचा सण दिवाळी मध्ये येतो.संपूर्ण जग हे लक्ष्मी म्हणजेच धन संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करीत असते.म्हणून या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करून लक्ष्मी माता प्रसन्न करून घेण्याची प्रथा आहे.

मनुष्याच्या जीवनात आनंद,प्रसन्नता,आरोग्य या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पैसा या गोष्टीची खूप गरज असते आजच्या आधुनिक काळात पैशाशिवाय कुठलेही काम करता येत नाही.पैसा हा आजच्या युगात सर्वस्व झाला आहे.म्हणून या दिवशी पैशाची देवाता म्हणजेच लक्ष्मी मातेची पूजा विधी महत्वाचा मानला जातो.


कुबेर पूजन


कुबेर पूजन कुबेर पूजन कसे करावे

लक्ष्मी पूजन च्या दिवशी लक्ष्मी पूजन बरोबर कुबेर पूजन पण केले जाते.कारण कुबेर ही देवता धन आणि विश्व रक्षण करणारी देवता आहे.या दिवशी कुबेर पूजन करण्यात येते.कुबेर मूर्ती स्थापन करून धूप, दीप, नैवेद्य,अक्षता वाहून कुबेर पूजन करावे.कुबेर देवाकडे लक्षित मागणे मागावे आणि देवाची मनोभावे पूजा करावी.


लक्ष्मी पूजन मुहूर्त 2022


लक्ष्मी पूजन मुहूर्त: 

संध्याकाळी 06.53 ते रात्री 08.16 (24 ऑक्टोबर 2022,सोमवार)


अमृत ​​काल मुहूर्त: 

सकाळी 08.40 ते सकाळी 10.16 (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)


अमृत ​​काल मुहूर्त: 

सकाळी 08.40 ते सकाळी 10.16 (24 ऑक्टोबर 2022, सोमवार)


लक्ष्मी पूजन मुहूर्त 2021


दिवाळी 2021 शुभ मुहूर्त


दिवाळी 4 नोव्हेंबर 2021,गुरुवार


अमावस्या प्रारंभ 4 नोव्हेंबर,गुरुवार सकाळी 6.03 पासून


अमावस्या समाप्ती 5 नोव्हेंबर,शुक्रवार 2.44 पर्यंत.


लक्ष्मी पूजन  2021


सकाळी 6 वाजून 9 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 20 मिनिटे हा काळ लक्ष्मीपूजन करण्यासाठी शुभ आहे.


प्रदोष काळ


05:34:09 ते 08:10:27


वृषभ काळ


06:10:29 ते 08:06:20



लक्ष्मीपूजन कसे करावे?


  • घरात छान रांगोळी काढावी.
  • त्यावर पाट मांडावा.
  • पाटावर लक्ष्मीची मूर्ती स्थापन करण्यात यावी.
  • गहू किंवा तांदूळ चे स्वस्तिक काढून त्यावर कलश स्थापन करावा.
  • लक्ष्मी मातेची मूर्ती आणि शेजारी कुबेर मूर्ती स्थापन करण्यात यावी.
  • धूप, दीप,अगरबत्ती,फुले पूजेसाठी वापरावीत.
  • घरातील सर्व धन पाटावर मांडावे.
  • धूप, दीप प्रज्वलन करुन लक्ष्मी माता आणि कुबेर पूजन करण्यात यावे.
  • दिवाळी फराळ आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा.
  • लक्ष्मी माता आणि कुबेर पूजन करून मनातील इच्छा बोलाव्यात आणि त्या पूर्ण करण्यासाठी लक्ष्मी मातेस सांगावे.
  • मनापासून केलेली कोणतीही पूजा नक्कीच लाभदायी ठरते हे लक्षात ठेवा.


लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हे खास उपाय


लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हे खास उपाय

या दिवशी अक्षता घेऊन त्यावर हळद कुंकू टाकून,धूप दीप ओवाळावे,त्या अक्षता आपली तिजोरी किंवा पाकीटात ठेवाव्यात.


या दिवशी लक्ष्मीचे वाहन घुबड पक्षाचे पंख मिळवून त्याची पूजा करून ते आपल्या तिजोरीत ठेवावे.


दिवाळी म्हणजे काय तर सर्व समाजाला एकत्र करणारा मोठा उत्सव होय.त्यामध्ये समाजाचे सर्व प्रश्न जसे धन, संपत्ती,आनंद ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या दिवाळी सणामध्ये सोडवली जातात. lakshmipujan, LakshmiPuja diwali,धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी,भाऊबीज,दिवाळी पाडवा या सर्व सणांचा एक आनंददायी,उत्साहाचा,आनंदाचा क्षण म्हणजेच दिवाळी होय.


Jagatik hruday din in marathi अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी

 Jagatik hruday din in marathi,World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.

Jagatik hruday din in marathi,World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.

 Jagatik hruday din in marathi, World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.आजच्या आधुनिक,धावपळीच्या युगात माणसाकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो,आणि मग एखाद्या दिवस अचानक कळत की अमुक अमुक चा हृदय विकाराने मृत्यू झाला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने हृदय विकारबाबत खूप कार्यक्रम राबवले जातात.ज्याने त्याने आपल्या हृदयाची काळजी घेतलीच पाहिजे.jagtik hruday din,२९ सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो की हा आजार जागतिक पातळीवर आणि खूप मोठ्या प्रमाणावर होणारा आजार आहे,लोकांना त्याविषयी माहिती व्हावी हा या मागे हेतू आहे.


हार्ट अटॅक म्हणजे काय? ( What is heart attack?)


हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांनपैकी एखादी रक्तवाहिनी बंद पडली की हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा बंद होतो आणि हार्ट अटॅक येतो.


हार्ट फैल्यूअर म्हणजे काय? ( What is heart fellure?)


या मध्ये हृदयाचे स्नायू कमजोर होतात आणि हृदय प्रसरण पावते,हृदयातून रक्त बाहेर टाकले जाते त्याला पंपिंग असे म्हणतात.साधारण व्यक्तीचे हृदय ५० ते ६०% पंपिंग क्षमतेने काम करते तर हार्ट फैल्यूअर व्यक्तीमध्ये हे प्रमाण ४०% कमी होते.


का होतो हृदय रोग? (Why does heart disease occur?)


वर्ल्ड हार्ट फेडरेशन च्या मते धूम्रपान,डायबेटिस,उच्च रक्तदाब,लठ्ठपणा,प्रदूषण या मुळे हृदयासंबंधी आजार वाढत आहे,त्यांच्या मते दरवर्षी हृदय आजारांनी लाखो लोक मरण पावतात.


नॉन कम्यूनेकेबल डीसिस


हृदय विकार हा संसर्गजन्य आजार नसून तो मानवाच्या जीवनशैली विरुद्ध आजार आहे,माणसाची जीवनशैली बदलल्यास तो होतो.उदा.धूम्रपान,तेलकट पदार्थ अधिक खाणे,लठ्ठपणा ई.जागतिक आरोग्य संघटनेने हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी २०१३ या सालापासून प्रयत्न सुरू केले आहेत.त्यांच्या मते हा वाढणारा आजार २०२५ पर्यंत २५% कमी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.या आजाराबद्दल लोकांना माहिती व्हावी या साठी दर २९ सप्टेंबर रोजी हा jagatik hruday din साजरा केला जात असतो.


हृदय विकाराची लक्षणे (Symptoms of heart disease)


हृदय रोग येण्यापूर्वी महिनाभर त्याची वेगवेगळी लक्षणे दिसून येत असतात,त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले असता,जीवावर बेतू शकते,म्हणून हृदय विकाराची लक्षणे ओळखून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे,चला तर पाहू कोणकोणती लक्षणे दिसून येतात.


चालताना छाती खूप जड झाल्यासारखी वाटते.

अचानक श्वास घ्यायला त्रास होतो.

चालताना दम लागतो.

काहीही खाताना जळजळ होते.

काही खाल्ल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणे,चालताना दम लागणे.

चक्कर, उलटी,पोटाच्या समस्या दिसणे 

सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे थकवा येणे,चालताना डावा हात दुखणे,खोकला, कफ आणि हात पाय यांना सूज येणे.हे गंभीर लक्षणे आहेत ही लक्षणे दिसून येताच डॉक्टरांची भेट घ्यावी.


हृदय विकार काय काळजी घ्यावी? (What to watch out for heart disease?)


खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.तेलकट,मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

सर्वात महत्वाचे तेल कमी वापरा,नैसर्गिक तेल वापर करा.

व्हिटॅमिन बी6,फॉलीक अँसिड,व्हिटॅमिन सी घ्या.

३० वर्षानंतर रक्तदाबाची वेळेवर तपासणी करावी.

धूम्रपान टाळावे.

रोज व्यायाम,योगासने करावीत.


मानवाचे हृदय हा मानवाचा सर्वात महत्वाचा अवयव आहे,त्याची निगा राखणे खूप गरजेचं आहे. खाणपिण्यावर नियंत्रण,व्यायाम, योगासने या सर्व कारणांमुळे हृदय विकार होण्यापासून बचाव होऊ शकतो.मानवाची बदलती जीवनशैली ही या आजारास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली आहे.

आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रात होणारे बदल,या मुळे होणारी धावपळ,कामाचा ताण,धूम्रपान या सर्व कारणांमुळे हृदय विकार आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढू लागला आहे.आपण वेळेत सावध होऊन हृदय विकार होण्यापासून स्वतःचा बचाव करणे हे खूप गरजेचं बनलं आहे.


Jagatik hruday din in marathi,World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. Information G या आमच्या ब्लॉगला नक्की फॉलो करा, शेअर करा, लाईक करा.

असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा

 असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा,हरतालिका 2022, हरतालिका व्रत कसे करावे,हरतालिका व्रत पूजा,मुहूर्त,हरतालिका व्रत माहिती,haratalika vrat information in marathi


असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा,हरतालिका 2022, हरतालिका व्रत कसे करावे,हरतालिका व्रत पूजा,मुहूर्त,हरतालिका व्रत माहिती,haratalika vrat information in marathi

भाद्रपद शुध्द तृतीयेला सुवासिनी स्त्रिया हरतालिका व्रत करतात.या दिवशी हरतलिकेचा उपवास करतात. हरतालिकेची पूजा करतात, भगर खाऊन उपवास करतात.सामूहिक समारंभ आयोजित करून हळदी कुंकू,भेटी गाठी,मनोरंजनाचे कार्यक्रम राबवले जातात. हरतालिकेच्या दिवशी स्रिया जागरण करून दुसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन करतात.हरतालिकेच्या दिवशी आदिमाया व शिवशक्ती यांचे मिलन झाले व जगतकल्यानाचे कार्य पार पाडले.


हरतालिका धार्मिक कथा


राजा दक्षाच्या आपमनाने क्रुद्ध झालेल्या शंकरांना माता पार्वतीने खडतर तप करून प्रसन्न करून घेतले.अनुपम लावण्यवती,राजकन्या,रूपवती,सर्व सुखांत लोळणारी असूनही देवांच्या रक्षणासाठी शिवकृपेची गरज असून या सर्व सुखांवर पाणी फिरून पार्वतीने शंकरांशी विवाह केला.सर्व देवांचे दुःख, संकटे दूर केली.अशी धार्मिक कथा सांगितली जाते.


हरतालिकेच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी


1) क्रोध करणे टाळावे

या दिवशी क्रोध,राग,मत्सर करू नये,शांत अंतःकरणाने पूजा करावी,उपवास,व्रत करावे,क्रोध या दिवशी जवळही येऊ देऊ नका.


2) अपमान करू नये

या दिवशी कोणाचाही अपमान करू नये,लहान थोर सर्वांचा आदर करावा,कुणालाही दुःख देऊ नये.कोणीही दुखावेल असे अपशब्द कुणालाही वापरू नये.


3) झोपू नये

हरतालिका व्रताच्या दिवशी झोपू नये,रात्रभर भजन,कीर्तन करावे,व्रत करणाऱ्याने दिवस रात्र झोपू नये,भजन कीर्तन करावे.


4) खाणे-पिणे टाळावे

हरतालिका व्रत हे निर्जल करण्याचे विधान आहे,या दिवशी खाणे पिणे टाळावे,जास्त आवश्यकता वाटल्यास दूध,पाणी,फळ आहार अगदी अल्प प्रमाणात करावा,शक्यतो पाणी व दूध घ्यावे.


हरतालिकेचे महत्व


भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात हरतालिका साजरी केली जाते.

महिलांनी या दिवशी व्रत करावे.निर्जल उपवास करावा,रात्री फलाहार घ्यावा.

हिंदू धर्मानुसार परवतीमातेने केलेल्या व्रतामुळे त्यांना शिव शंकराची प्राप्ती झाली.

देशात सर्वत्र हरतालिका साजरी करण्यात येते फक्त स्वरूप वेगवेगळे असते.

हिंदुधर्मात हरतालिकेला खूप महत्व आहे.

गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हा दिवस साजरा केला जातो.

या प्रकारे हरतालिकचे हिंदू धर्मात खूप महत्व आहे.खासकरून स्रिया दिवशी मोठ्या प्रमाणात व्रत करतात. हिंदू धर्मानुसार हरतालीकच्या दिवशी केलेल्या व्रतामुळ सर्व ईच्छा,आकांक्षा,सुख,समृद्धी प्राप्त होते.


हरतालिका व्रत करण्यास लागणारे साहित्य


  • 1. शिव व पार्वतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी वाळू आणावी 

  • 2. शिव पार्वती च्या मूर्ती ठेवण्यासाठी चौपाई

  • 3. चौपई झाकण्यासाठी वस्त्र

  • 4. नारळ

  • 5. पाण्याचा कलश

  • 6. आंब्याची पाने

  • 7. तूप

  • 8. दिवा

  • 9. अगरबत्ती,धूप

  • 10. कापूस

  • 11. कापूर

  • 12. शिव पार्वती च्या मूर्ती ठेवण्यासाठी एक छानसे पात्र.


हरतालिका व्रत कसे करावे


हरतालिका पूजेसाठी एक लाल वस्त्र पसरून त्यावर भगवान शिव व पार्वतीचे मूर्ती,फोटो ठेवावा.


भगवंतांच्या अभिषेकासाठी एक पात्र घ्या.


अक्षता घेऊन त्यावर कलश स्थापन करावा.


कलाशामध्ये नाने,सुपारी,खारीक,हळद घाला.


कलाशा शेजारी पान,सुपारी ठेवा आणि त्यावर तांदूळ व एक दिवा भरलेली वाटी ठेवा.


पान व सुपारी घेऊन त्यावर अक्षता वाहून गौरी व गणेशाची मूर्ती स्थापन करा.


पूजा सुरू करा देवांना दूध,तांदूळ अर्पण करा.


सर्व देवतांना दीप कलश घालून पूजा करावी.


आमच्या लोकप्रिय पोस्ट नक्की बघा.


बैल पोळा सजावट आणि माहिती नक्की बघा.


अशा प्रकारे हरतालिका व्रत करावे,या व्रतास भारतात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, हरतलिकेच्या व्रत केल्यास सर्व दुःख,संकटे दूर होऊन जीवनात सुख,शांती, समाधान प्राप्त होते. हरतालिकेचे व्रत हे खूप श्रेष्ठ असून जो ते मनोभावे पूर्ण करील त्याच्या सर्व ईच्छा आकांक्षा माता पार्वती व शिव शंकर पूर्ण करतील या प्रकारची अख्यायिका या व्रतामागे आहे.


असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा,हा आमचा लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन लेख,माहिती मिळवण्यासाठी आमच्या Information G या ब्लॉगला अवश्य फॉलो करा.


बैल पोळा अशी करा बैलांची भन्नाट सजावट,bail pola information in marathi

https://www.informationg.com/2022/08/bail-pola-information-in-marathi.html?m=1

 
बैल पोळा माहिती मराठी,bail Pola mahiti marathi,bail Pola information in marathi, बैल पोळा निबंध

बैल पोळा माहिती मराठी,bail Pola mahiti marathi,bail Pola information in marathi, बैल पोळा निबंध


भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये आज देखील मोठ्या प्रमाणावर बैलांच्या साह्याने शेती केली जाते.अशा या माणसाला उपयोगी पडणाऱ्या प्राण्याला वर्षातून एकदा मोठ्या दिमाखाने सजवून त्याची पूजा केली जाते. त्यालाच आपण बैलपोळा असे म्हणतो. भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच प्राण्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे.सर्व प्रकारचे प्राणी आपल्या उपयोगी येतात म्हणून आपण त्यांचे ऋण विसरता कामा नये,अशी आपली संस्कृती सांगते म्हणूनच ,आज देखील भारतातील काही राज्यांमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. आज आपण बैलपोळा सणाबद्दल माहिती आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा बैलपोळा या विषयावर निबंध पाहणार आहोत.

बैल पोळा तिथी,बैल पोळा कधी साजरा केला जातो (When celebrate bail pola)


भारतामध्ये प्राचीन काळापासून श्रावण महिन्यामध्ये विविध सणांची रेलचेल असते .श्रावण महिन्यातील अमावस्या आणि भाद्रपद महिन्यातील अमावस्या या दोन अमावस्यांना भारतातील काही भागांमध्ये श्रावणी बैलपोळा ,श्रावणी अमावस्याला व भाद्रपदी बैलपोळा ,भाद्रपद अमावस्येला साजरा केला जातो याचप्रमाणे ,कर्नाटकात देखील कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. अशाप्रकारे भारतामध्ये महाराष्ट्र ,कर्नाटक ,मध्य -प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये वेगवेगळ्या तिथींना बैलपोळा हा सण ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

ऋण व्यक्त करणारा सण बैल पोळा  (A debt-giving festival called Bail Poal)


भारत हा देश पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये पूर्वी आणि आत्ता देखील बहुसंख्य शेतकरी शेतीसाठी बैल या प्राण्याचा वापर करतात. बैल हा प्राणी मोठ्या प्रामाणिकपणे वर्षभर शेतकऱ्यासाठी म्हणजेच आपल्या मालकासाठी शेतामध्ये राबवत असतो. बैलाला शेतकरी आपल्याच कुटुंबातील एक सदस्य म्हणून समजत असतो. शेतकऱ्याबरोबर वर्षभर राब- राब राबणाऱ्या बैलाला वर्षातून एक दिवस कामातून विश्रांती मिळावी तसेच मालकासाठी राबणाऱ्या या प्राण्याचे ऋण फेडण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. 

बैलांप्रती ऋण व्यक्त करण्याचा हा सण भारतातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात. बैल हा एक प्राणी असून त्याला देखील भावभावना असतात .त्याला देखील विसावा हवा असतो. त्याच्या देखील प्राणाची कदर करायला हवी .या सर्व भावनेतून बैलपोळा सण वर्षातून एकदा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

बैल पोळा सजावट कशी करावी (How to decorate bull in bail pola)



बैल सजावट फोटो,बैल पोळा माहिती मराठी,bail Pola mahiti marathi,bail Pola information in marathi, बैल पोळा निबंध


बैलपोळ्याच्या सणाच्या आदल्या दिवशी आणि बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ आंघोळ घालावी.
  • बैलांच्या नख्या व शिंगे साळून स्वच्छ करावी.
  • बैलांच्या अंगाला तेल चोळावे.
  • बैलांच्या अंगावर झुल घालावी.
  • सिंगांना छान कलर किंवा सोनेरी कलर लावावा.
  • सिंगांना कलर लावल्यानंतर त्यावर रंगेबिरंगी बेगडे चिटकवीत.
  • बैलांच्या अंगावर कलर ने उठून दिसेल अशी नक्षी काढावी.
  • या दिवशी बैलांना नवीन मोरखी ,नवीन घुंगराची माळ ,मण्यांची माळ घालावी.
  • बाजारात बैलांच्या सजावटीचे वेगवेगळे सामान आणावे.
  • बैलांच्या पायामध्ये घुंगरांच्या माळा घालाव्यात. 
  • बैल सजावट आकर्षक आणि मनमोहक करावी.

अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी वर्षभर कठोर परिश्रम करणाऱ्या बैलांची सजावट करताना शेतकरी देखील मागेपुढे न पाहता आवश्यक तो सर्व खर्च करून ,आपला बैल इतर शेतकऱ्यांच्या बैला पेक्षा आकर्षक आणि मनमोहक कसा दिसेल यासाठी प्रयत्न करतात.


बैल पोळा सण कसा साजरा करावा ( How to celebrate bail pola)


बैल पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना मस्तपैकी अंघोळ घालावी. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कोणत्याही कोणत्याही कामाला जुंपू नये हा दिवस बैलांचा मानाचा दिवस असतो बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना आकर्षक आणि मनमोहक रीतीने सजवावे बैलांवर गुलाल भंडाऱ्याची उधळण करावी संध्याकाळी गावच्या ठिकाणी मुख्य दैवताला बैल जोड्यांची वाजत गाजत प्रदक्षिणा घालून आणावी घरी आल्यानंतर बैलांची स्त्रियांनी पूजा करावी आणि त्याला पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा बैलामुळेच आपल्याला वर्षभर जेवायला मिळते म्हणून या दिवशी बैलाला अवश्य पुरणपोळी खाऊ घालावी आपल्या पाहुण्यांना या दिवशी बैलपोळा सणाला आवर्जून बोलवावे अशा रीतीने ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत बैलपोळा सण साजरा केला जातो.


बैल पोळा निबंध मराठी (Bail Poal Essay in Marathi)


"चल माझ्या सर्जा,चल र राजा,बिगी-बिगी डौलान,गाऊ मोटवरच गाणं ."

या गाण्याप्रमाणेच शेतकऱ्याचं आणि बैलाचा आयुष्य असतं रोज उठून कामावर जाणार आणि काळ्या आईची सर्वांना थकता करणे. मालकाबरोबरच बैल देखील शेतात राबत असतो अशा या बैलासाठी वर्षातून एक दिवस आपण बैलपोळा हा सण साजरा करतो.या दिवशी बैलांना धुतलं जातं चांगली सजावट केली जाते, गावामधून मिरऊन आणले जाते घरी आल्यानंतर ओवाळून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. 

बैलांप्रती आपल्या असणारे ऋण व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. प्राणीदेखील मानवासाठी मोलाचे आहेत हा संदेश या सणामधून दिला जातो. वर्षभर राबणाऱ्या बैलासाठी विसावा म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. आजच्या आधुनिक युगात शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. याचा परिणाम म्हणून बैलांची संख्या घटत चालली आहे. असे असून देखील या सणाचे महत्त्व किंचितही कमी झाले नाही. ज्या लोकांकडे खरे बैल नाहीत ते मातीचे बैल आणून त्यांची पूजा करतात.

भारताच्या ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळते.बैल सजावटीच्या वस्तू तयार करून बरेच कामगार आपला उदरनिर्वाह करतात.एकंदरीत बैलपोळा सण ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारा सण आहे.असा बैलपोळा मला खूप आवडतो.

बैलपोळा हा सण ग्रामीण भागातील लोकांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा हा सण आहे. ग्रामीण भागात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा बैलपोळा हा सण आहे.बैल पोळा माहिती मराठी,bail Pola mahiti marathi,bail Pola information in marathi, बैल पोळा निबंध हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा.


राष्ट्रीय क्रीडा दिन, हॉकीच्या जादुगरचे स्मरण , national sports day in marathi

राष्ट्रीय क्रीडा दिन,national sports day in marathi,मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध


राष्ट्रीय क्रीडा दिन,national sports day in marathi,मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध


मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट


भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे झाला.मेजर ध्यानचंद यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लष्करात प्रवेश केला.भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत सुरू झाला.मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत भारताने सलग तीन वेळा ऑलिंपिक गोल्ड मेडल मिळवले.जागतिक हॉकी खेळात पहिल्या स्थानावर विराजमान असणाऱ्या या खेळाडूला हॉकीचे जादूगार असेच म्हटले जाते.

भारत सरकारने देखील मेजर ध्यानचंद यांच्या कामगिरीची दखल लक्षात घेऊन त्यांना 1956 साली देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले.भारतीय हॉकीला जागतिक पातळीवर खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल भारत सरकारने त्यांचा येथोचित असा गौरव केला.हॉकी खेळात 1000 हून अधिक गोल करण्याची अविश्वासनीय अशी कामगिरी त्यांनी केली आहे.याच कारणामुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे संबोधले जाते.

मानवी जीवनामध्ये खेळाला खूप महत्त्व आहे.खेळाने माणसाची शारीरिक प्रगती होत जाते.खेळामुळे व्यायाम होतो.खेळामुळे आरोग्य निरोगी राहते म्हणूनच,कोणत्याही देशात खेळाला खूप महत्त्व असते.प्रत्येक देशात दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो.भारतात देखील मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ 2012 पासून त्यांच्या नावाने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.अशा या महान खेळाडूचे निधन 3 डिसेंबर 19 रोजी झाले.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व ( Importance of national sports day)


मानवी आयुष्यामध्ये खेळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.खेळाचे फायदे मोठ्या प्रमाणात आहेत.मानवाची शारीरिक क्षमता विकसित करणे आणि आरोग्य निरोगी राखणे खेळामुळे शक्य होऊ शकते."व्यायामाला बिना पैशाचा डॉक्टर "असे संबोधले जाते आणि खेळामुळे मोठ्या प्रमाणावर व्यायाम होतो म्हणूनच,खेळाच्या माध्यमातून माणसाला निरोगी आयुष्य जगता येणे सहज शक्य आहे.

आजच्या आधुनिक युगात माणूस धकाधकीच्या आयुष्य जगत आहे. माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुद्धा वेळ नाही.आजच्या या आधुनिक युगात खेळाचे महत्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले आहे.लोकांना खेळाचे महत्व पटवे म्हणून शासन विविध प्रयत्न करताना दिसून येते अगदी,शाळा स्तरावरून याचा प्रयत्न होताना दिसून येतो. खेळाडूंना विविध प्रकारच्या सवलती देण्यात येतात.भारतासारख्या देशात असंख्य असे खेळाडू तयार व्हावे ही सरकारची इच्छा असते परंतु,या धकाधकीच्या आयुष्यात ते साध्य होताना दिसत नाही.

लोकांनी वैयक्तिक आयुष्यातून थोडे बाहेर येऊन खेळायलाही महत्त्व द्यावे. प्रत्येक नागरिकाने खेळावे,बागडावे,व्यायाम करावा.प्रत्येक नागरिकाला खेळाचे महत्व माहित व्हावे म्हणून,भारतामध्ये दरवर्षी भारताचे प्रसिद्ध हॉकीपटू हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

जीवनात खेळाचे महत्व निबंध  ( Sports importance in life essay in marathi)


मानवी जीवनामध्ये खेळाला प्राचीन काळापासून अनन्यसाधारण असे महत्त्व देण्यात आले आहे.भारतात देखील प्राचीन काळी कुस्ती,मल्लखांब, विविध मैदानी खेळ यांच्या स्पर्धा भरवल्या जात.राजे-महाराजे खेळांना आश्रय देत.त्याकाळी खेळांचे महत्व लोकांनी जाणले होते दुर्दैवाने आजच्या आधुनिक युगात आपण खेळाचे महत्व विसरत चालले आहोत. खेळांची खरी गरज आजच्या युगातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आहे.

आज भारतामध्ये जगातील दोन नंबरची लोकसंख्या असून देखील, ऑलम्पिक मध्ये पदक मिळवताना भारतासारख्या देशाची दमछाक होताना दिसून येते.भारतापेक्षा लहान-लहान देश मोठ्या प्रमाणावर पदके मिळवतात.या गोष्टीचा आपण मोठ्या प्रमाणावर विचार केला पाहिजे. देशातील मुलांना शालेय स्तरापासूनच खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ असून भारताने खेळासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर राहणे हे अत्यंत भूषणावह आणि देशाच्या लौकिकात भर घालणारी बाब आहे.मानवी जीवनामध्ये खेळासाठी रोज किमान अर्धा तास तरी द्यायला हवा.खेळामुळे माणसाचा व्यायाम होतो.व्यायामामुळे माणसाचे आरोग्य निरोगी राहते.खेळ हा मनुष्याला जीवनामध्ये कधीच निराशा येऊ देत नाही.

जीवनामध्ये खेळाला नेहमी उच्च स्थान द्यावे.खेळामुळे माणसाच्या आरोग्यात खूप चांगले बदल घडून येतात.खेळामुळे माणसाला समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण होते.खेळामुळे माणसाच्या जीवनात चांगले बदल घडून येतात.खेळ हा माणसाच्या जीवनात चांगले बदल घडवून आणतो.

राष्ट्रीय क्रीडा दिन निबंध 10 ओळींमध्ये ( National Sports Day essay 10 lines in marathi)



राष्ट्रीय क्रीडा दिन,national sports day in marathi,मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध



1. दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.
2. मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो.
3. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते.
4. राष्ट्रीय क्रीडा दिन भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
5. या दिवशी मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला.
6. राष्ट्रीय क्रीडा दिनामुळे नागरिकांना खेळाचे महत्व लक्षात येते.
7. राष्ट्रीय क्रीडा दिवस विविध स्पर्धांनी साजरा करण्यात येतो.
8. या दिवशी देशात खेळाचे वातावरण तयार झालेले असते.
9. या दिवशी भारतातील महान खेळाडूंचे आपण स्मरण करतो.
10. भावी खेळाडूंसाठी हा दिवस खूप मौल्यवान असतो.


राष्ट्रीय क्रीडा दिन कसा साजरा करावा  (How to celebrate National Sports Day)


29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करताना आपण तो विविध प्रकारे साजरा करू शकतो.राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करताना तो नेहमी इतरांच्या स्मरणात राहील या पद्धतीने साजरा करा. राष्ट्रीय क्रीडा दिन आपण खालील पद्धतीने साजरा करू शकतो-

  • या दिवशी खेळाच्या स्पर्धा भरवाव्यात.
  • आपल्या गावातील खेळाडूंना बक्षीस द्यावीत.
  • नवीन खेळाडूंना प्रोत्साहन पर बक्षीस द्यावीत.
  • नागरिकांना खेळाचे महत्व माहित व्हावे म्हणून भाषणे ठेवावीत.
  • खेळाचे महत्व सांगणारे चित्रपट दाखवा.
  • खेळाचे महत्व सर्वांना समजावून सांगा.
  • या दिवशी भारतातील प्रसिद्ध खेळाडूंची संघर्ष कथा मुलांना सांगावी.
  • सर्व नागरिकांना खेळाचे महत्व पटवून द्यावे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे -

1. राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर - भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

2. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?

उत्तर - राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

3. मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित होते?

उत्तर - मेजर ध्यानचंद हॉकी खेळाशी संबंधित होते.


मोलाचे बोल -

जगामध्ये आज खेळाला खूप महत्त्व दिले जाते परंतु,भारतामध्ये याउलट स्थिती दिसून येते.भारतामध्ये आज देखील खेळांविषयी लोक फारसे चांगल्या नजरेने पाहताना दिसून येत नाही.भारतीय लोक खेळांबाबत अजून पूर्णपणे समजदार झालेले नसून,खेळ हे केवळ पैसा मिळवण्याचे साधन नसून आपले आरोग्य सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे कामगिरी बजावणारे अस्त्र आहे हे लक्षात घ्यावे.

लोकांना ज्यावेळेस खेळाचे महत्व लक्षात येईल त्यावेळेस भारत देश नक्कीच खेळात महासत्ता झालेला असेल.आमचा आजचा राष्ट्रीय क्रीडा दिन,national sports day in marathi,मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा.




जागतिक साक्षरता दिन, International Literacy Day 8 September in marathi

 
जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi

जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi 


साक्षरता म्हणजे काय? तर साक्षरता म्हणजे रोजच्या व्यवहारात एखाद्या व्यक्तीला आकडेमोड जमणे किंवा जीवनात व्यवहार ज्ञान कळण्याईतपत अंक,अक्षर ओळख असणे होय.आज जगात पाहिले तर सर्वात जास्त साक्षर असलेले देश प्रगत आहे आणि सर्वात निरक्षर देश अप्रगत राहिले आहेत.साक्षरता हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.साक्षरता म्हणजे जीवनात यशस्वी होण्यासाठी केलेले श्रम होय.आजच्या आधुनिक काळात साक्षरता हा शब्द खूप मौल्यवान झाला आहे.साक्षरता हि काळाची गरज बनली आहे.आज जगात खूप देश,राज्य अशी आहेत की जी साक्षरतेच्या बाबतीत मागासलेली आहेत.पुरुष वर्गापेक्षा स्री वर्ग या बाबतीत खूप मागासलेला आहे.जगातील हा साक्षरतेचा अनुशेष भरून काढण्यासाठी युनेस्को ने 8 सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.या दिवशी जगातील निरक्षर नागरिकांना साक्षर करण्याचा संकल्प सोडला जातो.


निरक्षरता हा मानवाच्या जीवनातील सर्वात मोठा शाप आहे.पण माणूस निरक्षर का राहतो? याचा विचार केला आहे का आपण? माणूस निरक्षर राहण्याची खूप कारणे आहेत.


  • जगातील बहुतेक विद्यार्थी घरच्या गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही.
  • जगातील काही भटक्या विमुक्त जमाती त्यांच्या अडचणींमुळे शिक्षण घेऊ शकत नाही.
  • स्थलांतरामुळे खूप विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही.
  • काही मुले बालकामगार बनतात म्हणून ते शिक्षण घेऊ शकत नाही.

या सर्व कारणांमुळे साक्षरता म्हणावी तशी दिसून येत नाही.युनेस्को च्या माध्यमातून या सर्व कारणांवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.भारतात सर्व प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते.यामुळे गरीब विद्यार्थ्यांची जेवणाची गरज भागली जाऊन त्यांना शिक्षणाचा आनंद मिळत आहे.भटक्या विमुक्त जमाती साठी जागोजागी शाळा चालवण्याचे कार्य सेवाभावी संस्था,सरकार करत आहे.सरकार निरक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे.भारतात मध्यंतरी प्रौढसाक्षर वर्ग सुरू करण्यात आले होते त्यामध्ये प्रौढ व्यक्तींना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले जात असत.आज अगदी कोणत्याही कंपनीत,कारखान्यात ,सरकारी नोकरी असो व खाजगी नोकरी असो सर्व क्षेत्रात शिक्षण गरजेचं आहे.अगदी रोजंदारीवर जरी काम असले तरी सही करण्यापुरते शिक्षण लागतेच.


साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी


  • ज्या त्या भागात तेथील बोलीभाषेत शिक्षण देण्याची सोय करण्यात यावी जेणेकरून तेथील नागरिक,विद्यार्थी यांमध्ये शिक्षणाविषयी आपुलकी निर्माण होईल.
  • लहान मुलांना हसत,खेळत मजेदार शिक्षण देण्याची सोय करण्यात यावी.लहान मुले शिक्षणाने लवकर कंटाळून जाऊ नये म्हणून खेळ,गाणी,गप्पा,गोष्टी यांमधून शिक्षण देण्याची गरज आहे.
  • शिक्षणात गावातील जाणत्या व्यक्तींची मदत घ्यावी.त्यांच्या कल्पना राबवण्याचा प्रयत्न करावा.
  • जागतिक शिक्षण क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन सर्व शिक्षकांना वेळेवर त्या त्या बदलांविषयी प्रशिक्षण देण्यात यावे.
  • शाळेत ग्रंथालये असावीत,ग्रंथ,पुस्तके हेच आपले गुरू असतात.
  • ग्रामीण भागात ग्रामीण विकास,सहकार्य या विषयी विविध कार्यक्रम राबवावेत.
  • मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून मुलांसाठी शाळेत विविध स्पर्धा, गायन,वादन,सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करण्यात यावी.
  • शासनाच्या सर्व योजना शाळा पातळीवर राबवण्यात याव्यात म्हणजे विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होतात.


जागतिक साक्षरता दिन का साजरा करण्यात येतो


  • जगातील निरक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
  • निरक्षर नागरिकांना साक्षरतेची गरज पटवून दिली पाहिजे.
  • निरक्षर नागरिकांना साक्षर बनवून जागतिक पातळीवर प्रगती साधने.
  • निरक्षरता तोटे नागरिकांना पटवून देऊन निरक्षरतेमुळे येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी त्यांना साक्षर करणे.
  • जगाची एकत्रित प्रगती साधण्यासाठी नागरिकांना साक्षर बनवून जगाची प्रगती साधणे.
  • सामूहिकपणे जगातील निरक्षरतेवर मात करणे.
  • जागतिक साक्षरता अभियान यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणे. 

निरक्षरतेमुळे होणारे परिणाम


  • निरक्षरता जीवनातील सर्वात मोठा कलंक आहे.
  • निरक्षर व्यक्ती जीवनात यशस्वी होत नाही.
  • निरक्षर व्यक्ती प्रगती साधू शकत नाही.
  • निरक्षर राष्ट्रे अप्रगत राहतात.
  • निरक्षरतेमुळे जीवनात खूप संकटे,अडचणी येतात.
  • निरक्षरतेमुळे जीवनमान खलावले जाते.
  • निरक्षरता आजच्या काळात सर्वात मोठा शाप आहे.
  • निरक्षरतेमुळे जगातील बहुतेक देश अप्रगत राहिले आहेत

या प्रकारे निरक्षरता हा मानवी जीवनात खूप मोठा कलंक आहे.महात्मा फुले यांनी लोकांच्या साक्षरतेसठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.भारतातील समाजसुधारकांनी शिक्षणाचे महत्व जाणले होते आणि भारतातील नागरिकांना साक्षरतेची गरज पटवून देण्यात समाजसुधारकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा शिक्षणाला खूप महत्व आहे. 

आज भारतात व जगात सुद्धा शिक्षणाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.तरी सुध्दा आजच्या काळात मोठ्याप्रमाणात शिक्षण गळती,शिक्षण नघेण हे प्रकार दिसून येतात. स्रियांच्या बाबतीत हे प्रमाण अधिक आहे.जागतिक साक्षरता वाढविण्यासाठी सर्व जगातील नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.कोणत्या समस्या,अडीअडचणी आहेत.यांचा अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याचा विचार केला पाहिजे.

जागतिक साक्षरता वाढविण्यासाठी खूप सारे प्रयत्न करण्याची गरज आहे.प्रत्येक घटकाची गरज लक्षात घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.जगातील नागरिक, मुले हे कोणत्या कारणाने निरक्षर राहिले याचा विचार केला पाहिजे,त्यावर संशोधन करून मग त्यानुसार प्रयत्न करणे गरजेचे आहे.जागतिक साक्षरता वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर अभियान राबविण्यात येत आहे.युनेस्को या बाबतीत खूप प्रयत्न करत असते.युनेस्कोच्या सहकार्याने जगातील बहुसंख्य देश,नागरिक साक्षर बनून त्यांनी निरक्षरतेवर मात केली आहे.

 

जागतिक साक्षरता दिवस 2022 थीम (World Literacy Day 2022 Theme )



जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi


नेहमी विचारले जाणारे प्रश्न - 


1. जागतिक साक्षरता दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो?

उत्तर - जागतिक साक्षरता दिवस 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.


2. जागतिक साक्षरता दिवस 2022 ची थीम कोणती आहे?

उत्तर - "साक्षरता शिकण्याची जागा बदलणे" आणि लवचिकता निर्माण करण्यासाठी आणि सर्वांसाठी दर्जेदार, समान आणि समावेशक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी साक्षरता शिकण्याच्या स्थानांच्या मूलभूत महत्त्वावर पुनर्विचार करण्याची संधी असेल.


3. जागतिक साक्षरता दिवस 2022 कधी आहे?

उत्तर - गुरुवार,08 सप्टेंबर,2022 रोजी आहे.



आजचा जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की सांगा.लेख आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.आणि आमच्या Information G या ब्लॉगला नक्की फॉलो करा.